या कवितेतील पहिली चार कडवी मी 2009 साली लिहली होती पण ही कविता तेव्हापासून अपूर्णच होती तब्बल 13 वर्षानंतेर आज ही कविता मी पूर्ण केली आहे *नक्कीच आवडेल आपणास ही कविता......* *तुला म्हटलं होतं मी..* तुला म्हटलं होतं मी या प्रेमाच्या शर्यतीत मी ससा तू कासव आपलं प्रेम या कल्पनेत बसवं माहित नव्हती तुला प्रेमाची शर्यत म्हणूनच तुला फिरवून आणलं तिथपर्यंत तू बोललीस परत येताना खूप छान आहे हे स्वप्नांचे झाड येथे झोप लागते सुंदर आणि गाढ *After 13 years...* शर्यत सुरु झाली मी ही सुटलो सुसाट आयुष्यातील संकटाची तुडवीत प्रत्येक वाट त्या डेरेदार झाडाखाली मी घेतली थोडी विश्रांती हातात हात घेऊन म्हणालीस तूच हवास जीवनाच्या अंती मला नाही जिंकायची ही धावण्याची शर्यत फक्त तू सोबत रहा माझा श्वास असेपर्यंत मला सोबत घेऊनच तू आयुष्याची वाटचाल केली सुरु देत प्रेम एकमेकांना बघ आपणच अजिंक्य ठरु ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत